काय परिस्थिती उद्भवली आहे, काही घरात आई बाबा पोरांशिवाय पोरके झाले आहेत, तर काही घरात पोरे आई बाबा शिवाय पोरकी झालीत. काय ही नियतीची क्रूर थट्टा? कधी संपणार हा जीवन मरणाचा खेळ ?
“जन्माला येतानाच प्रत्येकजण नशीब घेऊन येतो , प्रत्येकाचे श्वास ठरलेले असतात”
या शब्दात केलेले सांत्वन खरोखर पुरेसे होईल का या सगळ्यांसाठी ?
कोणी जात्यात तर कोणी सुपात, भांबावलेली अवस्था झालीय समाजातच नव्हे तर प्रत्येक घराघरात.
वैद्यकीय सेवा सुविधा आता तरी सर्वांना वेळेत उपलब्ध होतील का ?
Stay safe n healthy
Stay @home
