काळाची गरज म्हणून पाहू यात का ?

हे तुम्हाला मान्य आहे का ? : इच्छामरण

मध्यंतरी खूप विषय गाजला होता तो म्हणजे इच्छामरण. बराच उहापोह करण्यांत आला होता. विषय आहेच असा चिंतन करण्यासारखं.

दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत असा.

सर्व काही आहे, सुखसमृद्धी आहे पण माझ्याकडे आरोग्य नाही, मला जर्जर होऊन जगायचे नाही. मी बरा होईन पण भार होऊन किती आयुष्य जगू, निरर्थक कसा जगू ? या विवंचनेत आहे.

शरीर धडधाकट आहे. श्रम करण्याची ताकद आहे तर मला काम नाही. मी बेकार आहे.मी कंटाळलो या अशा जिण्याला. मी स्वतः आनंदी व खंबीर नाही तर इतरांना कोणाला कसा आनंदी ठेवणार, मी बोझ आहे का ? मी आत्महत्या केली तर अधिक बरे का ? मी नकारार्थी का झालोय ?

वरील दोन वेगवेगळे प्रश्न दिसतात. यासारखे अनेक प्रश्नांची वेगवेगळी उदाहरणे दिसतील आसपास .

दुसरा प्रश्न हा प्रश्न नाहीच खरेतर. त्यावर उपाय आहेत.
पण प्रश्न 1 मध्ये विचार करण्यासारखे आहे .

इच्छामरण कायदा हवाच हवा.
कारण ज्याला निष्क्रिय व गलितगात्र अवस्थेत जगून आपल्या माणसांना शारीरिक, आर्थिक त्रास देऊ नये असे आंतरिक वाटते. अशा जगण्यात स्वारस्य नसते. त्यांची पुढची पिढी निकोप ठेवण्यात पैसा व श्रम खर्च झाल्यास फायद्याचे आहे.

उलट असे परावलंबी व भार होऊन जगण्याचा त्याला त्रासच जास्त होतो.
मनुष्यबळ नसल्याने बंद घरात एकाकी मृत्यु आल्याची अनेक उदाहरणे घडत आहेत सध्या. त्यापेक्षा इच्छामरण स्वाभिमानी माणूस स्वीकारू शकतो. हे मरण पण नैसर्गिक समजावे समाजाने. तरच कायदा लागू होईल कोणतेही नवीन बदल स्वीकारताना विरोध होतोच.

एक महत्वाचे हा कायदा करताना पळवाटा नको. नाहीतर मरण स्वस्त होईल व नातेवाईकांनाच भांडवल मिळेल या कायद्याचे.
कारण आपल्याकडे कोणताही कायदा पाहिला तर गैरफायदा घेणारेही खूप आहेत.
जसे : महिला लैंगिक शोषण कायदा
हुंडा प्रतिबंध कायदा

खरे खोटे करण्यात जिन्दगी खलास होते.

विधितज्ञ, डॉक्टर, न्यायाधीश यांचे काम जिकिरीचे आहे याप्रकरणी.

कायदा व शांतता पालन करून गोपनीयता ठेवून हे अमलात आणता येईल का पाहणे आता नितांत गरजेचे आहे.

वीणा कुलकर्णी

Leave a comment